15 जुलैपासून बाईक आणि स्कूटरला टोल टॅक्स लागणार का? सरकारकडून ‘नियम’ला उत्तर.

toll-for-two-wheeler : दुचाकी वाहनांना टोल कर(toll-tax) लागणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. काही माध्यमांनी आणि दुचाकीस्वारांनी केलेल्या दाव्यांनुसार, 15 जुलैपासून दुचाकी वाहनांना टोल टॅक्स लागणार होता, ज्यामुळे अनेक दुचाकी मालक तणावाखाली आले होते. मात्र, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. मंत्रालयाने फास्टॅग आणि टोल टॅक्सच्या नियमांमध्ये बदल केले असून, 3000 रुपयांचा वार्षिक पास 15 ऑगस्ट 2025 पासून राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर लागू केला जाईल.

काय म्हणाले नितीन गडकरी?

केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी दुचाकीवरील टोल टॅक्सबाबत पसरवलेल्या दिशाभूल करणार्‍या बातम्यांचे खंडन केले आहे. त्यांनी ट्वीटद्वारे  स्पष्ट केले की, असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही आणि दुचाकी चालकांना टोलमध्ये पूर्णपणे सूट दिली जाईल. सत्य जाणून न घेता खळबळजनक बातम्या देणे हे निरोगी पत्रकारितेचे लक्षण नाही, असे गडकरींनी म्हटले आहे.

दुचाकीकडून टोल कर वसूल करण्याचे सत्य काय आहे?

बाइक आणि स्कूटरसाठी फास्टॅग(Fastag) आवश्यक आहे, नियम मोडल्यास २००० रुपये दंड किंवा दरमहा १५० रुपये टोल फी भरावा लागेल, असे काही दिशाभूल करणारे अहवाल आले होते. सरकारने या अहवालांना निराधार ठरवले आहे.

दुचाकी चालक टोल टॅक्स का मुक्त आहेत?(toll-for-two-wheeler)

दुचाकी आणि स्कूटरमुळे चारचाकी व मोठ्या वाहनांच्या तुलनेत रस्त्यांचे कमी नुकसान होते. तसेच, त्यांच्यासाठी स्वतंत्र टोल प्रणाली बनवणे खर्चिक आहे, कारण दुचाकी खरेदी करतानाच आजीवन कर भरला जातो. त्यामुळेच सरकार त्यांना टोल-मुक्त ठेवते.

टोल प्लाझा जवळ राहणाऱ्या लोकांकडून कर घेतला जात नाही

जर तुमचे घर टोल प्लाझापासून २० कि.मी.च्या आत असेल, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) टोलमध्ये सूट देते. यासाठी तुम्हाला अधिकृत निवासी पुरावा सादर करणे आवश्यक आहे. पुरावा सादर न केल्यास, टोल भरावा लागेल.

पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांसारख्या केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकृत वाहनांना टोल टॅक्स लागत नाही. भारतीय सैन्य, नौदल, हवाई दल आणि आपत्ती निवारण कार्यात गुंतलेल्या एनडीआरएफच्या गाड्यांनाही टोलमाफी आहे.

विशिष्ट पुरस्कार विजेत्यांना टोल करातून पूर्ण सूट

भारत सरकारने विशिष्ट पुरस्कार विजेत्यांना टोल करातून पूर्ण सूट दिली आहे. यात परमवीर चक्र, महावीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र विजेत्यांचा समावेश आहे. या शौर्य पुरस्कार विजेत्यांना देशभरातील कोणत्याही टोल प्लाझावर शुल्क लागत नाही. त्यांच्या वाहनांवर विशेष ओळख चिन्ह असते, ज्यामुळे टोल कर्मचारी त्यांना सहज ओळखतात आणि त्यांना न थांबता पुढे जाऊ देतात. याव्यतिरिक्त, राष्ट्रपती, पंतप्रधान, न्यायाधीश, खासदार, लष्करी वाहने आणि आपत्कालीन सेवा यांसारख्या इतर श्रेणींनाही ही सूट लागू आहे.

 

Social Media