Vidya-Balan : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना सुरुवातीला अनेकदा नकार मिळाला. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, जिने खडतर प्रवासानंतर यश मिळवले. करिअरच्या सुरुवातीला तिला निर्मात्यांनी ‘दुर्दैवी’ ठरवून १३ चित्रपटांमधून काढून टाकले होते. इतक्या नकारांनंतरही या अभिनेत्रीने हार मानली नाही आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने इतिहास घडवला.
विद्या बालनच्या करिअरमधला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट (Vidya-Balan)
आज आपण बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री (Famous-actress)विद्या बालनबद्दल बोलत आहोत. अभिनयासाठी ओळखली जाणारी विद्या, तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक अडचणींना सामोरी गेली. एक काळ असा होता की निर्माते तिला ‘पनौती’ मानू लागले होते, कारण तिचे १३ चित्रपट नाकारले गेले आणि काही सुरुवातीचे प्रोजेक्ट्स बंद पडले. यामुळे अभिनेत्री खूप निराश झाली होती. (Vidya-Balan)
सततच्या नकार आणि लोकांच्या या कडवट वागणुकीमुळे विद्या बालनचा आत्मविश्वास पूर्णपणे डळमळीत झाला होता. मात्र, हळूहळू या अभिनेत्रीने इंडस्ट्रीत एक खास स्थान निर्माण केले आणि १०० कोटींचा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला. 100 कोटी. या चित्रपटामुळे तिचा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये समावेश झाला आणि आज ती इंडस्ट्रीतील स्टार अभिनेत्रींपैकी एक बनली आहे.
100 कोटींच्या चित्रपटाने स्टार
अभिनेत्री विद्या बालनने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अगदी लहान वयात प्रसिद्ध सिटकॉम शो ‘हम पांच’मधून केली होती. हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो होता आणि या शोने अभिनेत्रींला चित्रपटांमध्ये प्रवेश करण्याचा मार्गही खुला केला. तथापि, तिच्या कारकिर्दीचा प्रारंभिक काळ तिच्यासाठी अजिबात सोपा नव्हता, कारण सुरुवातीला अनेक नकार आणि अपयशांचा सामना करावा लागला. पण पराभव स्वीकारण्याऐवजी तिने पुन्हा स्वत:ला उभे केले आणि लहानपणापासून पाहिलेले स्वप्न पूर्ण केले.
एका मुलाखतीत विद्या बालनने सांगितले होते की, इंडस्ट्रीमध्ये तिच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिला ‘खराब’ म्हटले जायचे. या गोष्टींचा तिच्यावर इतका खोल परिणाम झाला होता की, कित्येकदा ती रात्री रडत रडत झोपी जायची. ‘चक्रम’ चित्रपटाला तिचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून वर्णन करताना तिने खुलासा केला होता की ती एका जाहिरात शूटसाठी दक्षिण भारतात कशी गेली होती आणि तेथे चित्रपट निर्माते ऑडिशन घेत होते. यावेळी त्यांना ‘चक्रम’ चित्रपटासाठी मुलाखत देण्यास सांगण्यात आले आणि तिच्या आईने लगेच होकार दिला, कारण ती मोहनलालची मोठी चाहती होती.
२०१० मध्ये विद्या बालनच्या करिअरमधला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आला होता. याच वर्षी तिचा ‘नो वन किल्ड जेसिका’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकला. यानंतर ती ‘द डर्टी पिक्चर'(The-Dirty-Picture’) चित्रपटात दिसली. या चित्रपटात अभिनेत्री अतिशय बोल्ड आणि वेगळ्या अंदाजात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिकची कमाई केली होती. या चित्रपटानंतर तिचे नशीब बदलले आणि ती स्टार बनली.