Ramdas-Athawale : सर्व समाज घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई -प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सबका साथ, सबका विकास या धोरणानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी राज्यातील शेतकरी, कष्टकरी, दलित आदिवासी आणि मागासवर्गींयासह सर्व समाज घटकांना न्याय देणारा तसेच महाराष्ट्राला उत्कृष्ट पायाभूत सुविधा देवून महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने बुलेन ट्रेनच्या वेगाने पुढे घेवुन जाणारा अर्थसंकल्प दिला आहे. (Ramdas-Athawale)
असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
शेतक-यांना कर्जमाफी देवून विविध योजनांद्वारे राज्याच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी या अर्थसंकल्पातुन लाभणार आहे. मेट्रो रेल्वेद्वारे(Metro Rail) दळणवळणाचे तसेच पक्के रस्ते द्वारे राज्याच्या पायाभूत सुविधांना मजबुत करणारा तसेच झोपडीवासीय, महिला आणि सर्व दुर्बल घटकांना आर्थिक न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे.
दलित आदिवासींना सामाजिक न्याय देणारा अर्थसंकल्प आहे. राज्याला उत्कृष्ट अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे असे ना. रामदास आठवले यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.