नागपूर : Warning-of-heavy-rain : राज्यात अनेक भागांत दमदार पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शहरांमध्ये वाहतुकीची कोंडी झाली असून सखोल भागांत पाणी साचले आहे. विदर्भातील वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांत आज (२८ मे) हवामान विभागाने हलक्या ते मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
पूर्णा नदीला मोठा पूर(Warning-of-heavy-rain)
दरम्यान, पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी असलेली पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे. अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांत मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विदर्भात अवकाळी पावसामुळे वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. भंडारा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांत ही दुर्घटना घडली असून काही ठिकाणी जनावरांचेही मोठे नुकसान झाले आहे.
विदर्भात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांत पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला असून पाल नदीला पूर आल्याने गडचिरोली-आरमोरी मार्ग बंद झाला आहे.
हवामान विभागाने कोकण आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे, तर घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा इशारा दिला आहे.
या पावसामुळे गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक मार्ग बंद झाले असून एनडीआरएफच्या पथकाद्वारे बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
वीज कोसळून चार जणांचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात पाथरी गावात वीज कोसळल्याने मनीषा पुष्पतोडे (३२) आणि प्रमोद नागपुरे (४२) यांचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी गावात शेतात काम करत असताना वसंत चव्हाण यांचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात हळद उकळण्याचे काम करत असताना चंद्रविलास काठोळे यांचा मृत्यू झाला.
हवामान विभागाने पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि उघड्या जागेत उभे राहण्याचे टाळावे.
कृषी विद्यापीठाचा सल्ला
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले बळीराजा डिजिटल कृषी सल्ला प्रणाली विकसित केली आहे, जी शेतकऱ्यांना स्थानिक परिस्थितीनुसार अचूक आणि वेळेवर सल्ला देण्यास मदत करते. या प्रणालीद्वारे हवामान बदल, पीक व्यवस्थापन आणि शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन मिळू शकते.
विद्यापीठाने कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांना विशेष प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक प्रभावी सल्ला मिळू शकेल. या प्रणालीचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत सुधारणा करावी, असे विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी सांगितले.
तुमच्या भागातही पावसाचा प्रभाव जाणवत आहे का? सुरक्षित राहा!