‘लोकमाता अहिल्याबाई होळकर – एन इटरनल फ्लेम’ कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : Lokmata-Ahilyabai-Holkar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर – एन इटरनल फ्लेम’ या विशेष कॉफी टेबल (Lokmata Ahilyabai Holkar – An Eternal Flame)पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते २८ मे रोजी एनसीपीए, मुंबई येथे संपन्न झाले. हा विशेष कार्यक्रम सोशल स्टडीज फाउंडेशन आणि एनसीपीए – ‘पेज टू स्टेज’ या उपक्रमाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या पुस्तकाचे लेखन आणि संपादन अंबरीश मिश्र यांनी केले आहे.

या समारंभात महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री  मंगल प्रभात लोढा, कॅबिनेट मंत्री  आशिष शेलार, न्यायमूर्ती मृदुला भटकर (माजी न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय), प्रसिद्ध कवी प्रसून जोशी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री  फडणवीस यांनी आपल्या भाषणात नमूद केले की भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मोलाचे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो शौर्य आणि न्यायाचा वारसा दिला, तो पुढे नेण्याचे कार्य त्यांनी केले आणि म्हणूनच जनतेने त्यांना ‘पुण्यश्लोक’ ही उपाधी दिली. देशभरात त्यांनी मंदिरे आणि घाटांचे पुनर्निर्माण केले, महिलांसाठी विशेष सैन्य तुकडी स्थापन केली आणि अनेक कारागिरांसाठी बाजारांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली, असे त्यांनी या वेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की हे पुस्तक अतिशय उत्कृष्ट गुणवत्तेचे आहे आणि त्याच्या प्रती देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांना तसेच महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सर्व मंत्र्यांना पाठवण्यात येणार आहेत. तसेच त्रिशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकार एक व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती करत आहे आणि अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या तलाव आणि भक्तीस्थळांच्या संवर्धनाची जबाबदारीही राज्य सरकारने स्वीकारली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

The coffee table book Lokmata Ahilyabai Holkar – An Eternal Flame was officially launched on May 28 at NCPA, Mumbai, by Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and Union Minister for Women and Child Development, Annapurna Devi, as part of the tricentenary celebrations of Punyashlok Ahilyadevi Holkar.

This special event was jointly organized by the Social Studies Foundation and NCPA under the initiative Page to Stage. The book has been written and edited by Ambareesh Mishra, capturing the remarkable legacy of Ahilyabai Holkar.

Social Media