मुंबई : राज्य सरकारने शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) अनिवार्य करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिलपासून या क्रमांकाशिवाय शेतकऱ्यांना पीएम किसान योजना(PM Kisan Scheme), महाडीबीटी योजना(Maharashtra DBT scheme), पीक विमा(Crop insurance) आणि नैसर्गिक आपत्ती अनुदान यांसारख्या कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही.
सध्या १.७१ कोटी शेतकरी नोंदणीकृत आहेत, मात्र त्यापैकी ७० लाख शेतकरी अजूनही फार्मर आयडी (Farmer ID) पासून वंचित आहेत. सरकारने ग्राम कृषी विकास समित्या आणि फील्ड स्तरावरील यंत्रणांच्या मदतीने नोंदणीसाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.
केंद्र सरकारच्या ‘अॅग्रीस्टॅक’ उपक्रमाचा हा भाग असून, याद्वारे शेतकऱ्यांचे जमीन अभिलेख, पिक पद्धती आणि शासकीय लाभ डिजिटल स्वरूपात एकत्रित केले जातील.
‘हा’ आयडी आवश्यक
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता Farmer ID घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी हा आयडी आवश्यक असून, Farmer ID शिवाय कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही, असा स्पष्ट आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी माहिती चुकीची भरल्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेण्यात अडचण येत आहे.
शेतकऱ्यांनी प्रथम AgriStack पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यावर त्यांना एक तात्पुरता Farmer ID मिळतो. नोंदणीनंतर शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर झाल्यावरच हा आयडी अधिकृत मानला जातो. परंतु अनेक शेतकऱ्यांचे अर्ज अद्याप मंजूर न झाल्याने ते योजनांचा लाभ घेण्यात अडचणीत आहेत.
जर तुमच्याकडे Farmer ID असला आणि तरीही योजनांचा लाभ मिळत नसेल, तर खालीलप्रमाणे तुमची माहिती तपासा:
AgriStack संकेतस्थळावर लॉगिन करा.
वेबसाईटवर ‘Farmer’ पर्यायावर क्लिक करा.
मोबाईल नंबर आणि पासवर्ड किंवा OTP चा वापर करून लॉगिन करा.
मोबाईल नंबर व्हेरिफाय झालेला आहे याची खात्री करा.
‘View My Information’ वर क्लिक करा.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ….नसेल तर सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही